|

अध्याय १९ – द्वादशीचे महत्त्व

janm kundali janmkundali

अध्याय १९ – द्वादशीचे महत्त्व

“अती महान द्वादशी तिथी। बारा वाटा विघ्ने पळती।” अधिकमासातील पंचपर्वांमध्ये द्वादशी पर्वाचे महत्त्व फारच मोठे आहे. भगवान विष्णु म्हणाले, “लक्ष्मी, या पर्वातील थोडे जरी नियम पाळले तरी मनुष्याला मोक्ष पद मिळते. द्वादशी तिथी ही श्रीहरीची सर्वात जास्त प्रिय तिथी आहे. एकादशीला उपवास करावा आणि द्वादशीला पारणे करावे.

द्वादशीला एखाद्या तीर्थस्थानी जाऊन स्नान करावे. पितरांना तर्पण करावे. ब्राह्मणांना जलदान, अन्नदान द्यावे. धान्यदान, वस्त्रदान, पात्रदान, भूदान, सुवर्णदान, गोदान अशा अनेक दानांपैकी यथाशक्ती दान निष्ठापूर्वक करावे. विद्यादानाचे महत्त्व या तिथीला विशेष आहे. प्रत्येकाने अधिकमासातील द्वादशीला ‘अधिकमास माहात्म्य’ ही पोथी, पुस्तके, ग्रंथ शक्य तितक्या जास्त प्रती निदान पाच, सात किंवा बारा प्रती दान कराव्यात. – अधिकमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील द्वादशींना तूपदान, दीपदान दिल्याने लाभते. फार पुण्य लाभते. द्रव्य दान केल्याने मनोकामना पूर्ण होतात. प्रेम वाढते. सर्व पापे नाहीशी होतात. आरोग्य प्राप्त होते. समाधान, सुख मिळते. कामधंद्यात प्रगती होते.

द्वादशीला अन्नदान करणे हा एक मोठाच फायदा आहे. अन्नदान हे सर्व दानात श्रेष्ठ असे दान आहे. अन्नदात्याला प्राणदाता’ असे म्हणतात. तो देवरूप असतो. चैत्र वैशाखात जलदान, पौष माघात तीळगूळ दान अशा दानापेक्षाही अन्नदान आणि तेही अधिकमासातील

द्वादशीपर्वात जर केले तर साक्षात पुरुषोत्तम प्रसन्न होतात. या पर्वात अन्नावर, धान्यावर तुळशीपत्र ठेवून ते सत्पात्री दान करावे. गाईला अन्न चारावे आणि भुकेलेल्या इसमास अन्नदानाने संतुष्ट करावे.

या द्वादशी पर्वाच्या पुण्याईमुळे प्रत्यक्ष कुबेराला देवांच्या खजिन्याचे भांडार प्राप्त झाले. इंद्राला इंद्रपद मिळाले. यमाला प्रजासंयमाचे बळ मिळाले. दुर्वास मुनींच्या रागापासून अंबरीष राजाचे संरक्षण झाले.

अंबरीष राजाने एकादशी व्रत नियमाने केले होते. त्याच्या पारण्यास | दुर्वास मुनींना त्याने भोजनास निमंत्रण दिले होते; पण द्वादशीच्या दिवशी पारणे भोजनास येण्यासाठी दुर्वास मुनींना उशीर झाला. तोपर्यंत अंबरीष राजाने श्रीहरीचे तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वास मुनींना त्यामुळे खूप | | राग आला. अंबरीष राजाला दुर्वास मुनी शापून भस्म करणार होते. तेवढ्यात श्रीहरीने आपले सुदर्शन चक्र दुर्वास मुनींवर सोडले.

त्या चक्राच्या भीतीने दुर्वास मुनी पळून गेले. त्यांच्या मागे ते सुदर्शन चक्रही फिरतच होते. त्यामुळे दुर्वासाला पळता भुई थोडी झाली. श्रीहरीने आपला भक्त राजा अंबरीष याचे रक्षण केले आणि कोपिष्ट दुर्वासाला पिटाळून लावले. ही कथा पुराणात प्रसिद्ध आहे.

पंचपर्वातील अधिकमास द्वादशीच्या दिवशी तुपात तळलेले तेहतीस अनारसे पात्रात ठेवून त्यावर वस्त्र झाकून ते जावयास किंवा ब्राह्मणास दान द्यावेत. या अशा दानामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन कल्याण करतो. – अनारशाऐवजी तेहतीस बत्तासे, खारका किंवा सुपाऱ्या किंवा फळेही दान दिल्यास तितकेच पुण्य मिळते. द्वादशीला आप्तेष्ट मित्रांना, ब्राह्मण सुवासिनींना पक्वान्न-पुरणाचे धोंडे करून भोजन द्यावे आणि कर्पूर (कापूर) विड्याचे तांबूल द्यावे. तुळशीची पूजा आणि गोग्रास करून नंतर आपण भोजन करावे.

भगवान विष्णूंनी लक्ष्मीला अधिकमासातील पंचपर्वांची माहिती सांगितल्यावर त्या व्रतदानाच्या पुण्याईने कोणाकोणाचा कसा उद्धार

झाला, त्या कथा सांगितल्या. पुढे २० व्या अध्यायात ‘स्मितविलासिनी’ या अप्सरेची कथा आहे ती ऐका!

Similar Posts

  • घटस्थापनेचे शुभ मुहूर्त

    घटस्थापनेचे शुभ मुहूर्त !!! गुरुवार दि. ०३/१०/२४ रोजी घटस्थापना आहे.गुरुवार दि.०३/१०/२०२४ रोजी सूर्योदयापासून दिवसभर प्रतिपदा तिथी आहे.गुरुवार दि. ०३/१०/२४ रोजी हस्त नक्षत्र दु.०३:३१ पर्यंत आहॆ नंतर चित्रा नक्षत्र आहे.घटस्थापना करण्याकरीता सकाळच्या वेळेस योग्य मुहूर्त आहे.गुरुवार दि. ०३/१०/२३ रोजी घटस्थापना सकाळीचे मुहूर्त:- चंचल मुहूर्त:- स. ८:०० ते ९:३० पर्यंत.लाभ मुहूर्त:- स. ९:३० ते ११:०० पर्यंत.अमृत मुहूर्त:-…

  • | | |

    कालसर्प योग काय आहे? kalsarpa yog

    कालसर्प योग काय आहे?स्पष्ट कालसर्प योगाचे योगावयोगया जगात जेव्हा कुठलाही प्राणी ज्यावेळी जन्म घेतो ती वेळ त्या प्राण्याच्या सर्व जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाते. कारण त्या एका क्षणाच्या आधारे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने त्याच्या संपुर्ण जीवनाचा एक असा आलेख तयार केल्या जाऊ शकतो, ज्यामध्ये त्याच्या जीवनातील वेळो वेळो घडणाऱ्या शुभ व अशुभ घटनांच्या विषयी वेळेच्या आधीच जाणता येऊ शकते.

  • सत्यनारायणाची कथा : Satyanarayana Vrat Katha in

    सत्यनारायणाची कथा : Satyanarayana Vrat Katha in Marathi सध्या शुभमंगल कायााचा हंगाम सुरू असल्यानेमहाराष्ट्रातील गावागावांतील ध्वननक्षेपकांवरून ‘ऐकासत्यनारायणाची कथा’ हेकथागीत ऐकूयेत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहेका? कायआहेनतचेउगमस्थान? सत्यनारायणाची महापूजा हेमुळात काम्य व्रत. मनकामनापूती हा त्या पूजेमागचा हेतू. चौरंग, चार के ळीचेखुंट, गहू, पाण्याचा कलश, नवग्रहांच्या आनण अष्ट्नदशांच्या सुपाऱ्या, शानळग्राम वा बाळकृ ष्णाची मूती,सव्वाच्या मापानेरवा, तूप,…

  • Vrushchik Rashi

    राशीच्या जातकांना लोक साधारणपणे एक अशी व्यक्ती म्हणून ओळखतात ज्याची स्वतःची समज आणि स्वतःचे विचार आहेत. परंतु नवीन वर्ष 2023 मध्ये, ग्रहांची उलाढाल तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार बदलण्यासाठी भाग पडू शकते . विशेषतः, वैयक्तिक जीवनात, आपण आपल्या जोडीदारासह असे अनुभवू शकता. हे बदल चांगले आणि नवीन असतील. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे मदत मिळेल.

  • अन्तश्चेतना और स्वस्तिकासन: मानसिक शांति, ध्यान और आध्यात्मिक विकास के लिए सर्वश्रेष्ठ मार्ग

    अन्तश्चेतना और स्वस्तिकासन: मानसिक शांति, ध्यान और आध्यात्मिक विकास के लिए सर्वश्रेष्ठ मार्ग अन्तश्चेतना: एक गहन आत्मिक शक्ति अन्तश्चेतना मानव जीवन की वह गूढ़ और शुद्ध शक्ति है, जो व्यक्ति को उसके वास्तविक स्वरूप और शाश्वत सत्य से जोड़ती है। जैसा कि पूर्व अध्याय में वर्णित है, मन्त्र की सिद्धि और उसकी शक्ति अन्तश्चेतना पर…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.