काय करावे, काय करू नये!

अध्याय २७ – काय करावे, काय करू नये!

भगवान वैकुंठविहारी लक्ष्मीला म्हणाले, “रमा, प्रिये, अधिकमासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादि पुण्यकर्मे केल्यामुळे मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि प्रगती लाभते. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते.

ज्या घरी हे अधिकमास व्रत निष्ठापूर्वक विधीयुक्त होते त्या घरी उत्साहाचे पवित्र वातावरण राहाते. त्या घरी देवतांचा निवास होतो. त्यामुळे त्या घरातील दुःख व संकटे दूर पळतात. सर्व बाधा नाहीशा होतात. ते घर संतती व संपत्तीने भरून जाते.

loading…

अधिकमासात सांगितलेली अनेक व्रते, दाने, पुण्यकर्मे ज्या

कोणाला करणे शक्य नसेल त्याने आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती एखादा तरी नियम पाळावा. नित्यनेमाने स्नान, देवदर्शन, एकमुक्त भोजन, भूमिशयन, पोथीवाचन, श्रवण, शक्य ते दान, उपोषण, तुलसीपूजा याप्रमाणे नियम पाळावे.”

या नियमातील कोणतेही एक व्रत पाळल्यावर त्याचे उद्यापन शेवटी करावे. नक्तभोजन, मौनभोजन अशा व्रताचे उद्यापन म्हणजे शेवटी ब्राह्मणाला भोजन किंवा शिधा देऊन करावे. देवळात एखादी घंटा बांधूनही मौनभोजनाचे उद्यापन होते. दीपदान आणि तेहतीस अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे वगैरे वस्तू यथाशक्ती दान दिल्यानेही उद्यापन साधते. याप्रमाणे शक्य ते एखादे तरी पुण्यकर्म करावे.

या महिन्यात कांदा, लसूण, मसूर डाळ, शिळे अन्न वगैरे उत्तेजक, मांसल, मादक वस्तू खाऊ नयेत. अपेय पिऊ नये. परद्रोह, परनिंदा करु नये. रागाने बोलू नये. नको तेथे बसू नये. अशा प्रकारे आपले आरोग्य बिघडेल. मन अस्वस्थ होईल-अशा गोष्टी करू नयेत. कारण या तेराव्या महिन्यात एकही सूर्यसंक्रात नसल्याने वातावरण मलीन बनलेले असते. अशावेळी निर्मळ राहून आपले आपण पवित्र बनले पाहिजे!

याप्रमाणे या महिन्यात काय करावे आणि काय करू नये ते सांगितल्यावर पुढे अठ्ठाविसाव्या अध्यायात आणखी एक कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली ती ऐकावी.

Similar Posts

  • सूर्य यंत्र

    सूर्य यंत्र Surya yantra सूर्य यंत्र ब्रह्माड में सूर्य ही सर्वोपरि ग्रह है जिसके इर्द गिर्द सभी सितारे ग्रह और नक्षत्र घूमते हैं। पृथ्वी के सभी जड़ और चेतन पदार्थों पर इसकी रश्मियों का प्रभाव पड़ता है मौसम, वनस्पति, मानव सभी सूर्य किरणों से प्रभावित होते हैं डॉक्टरों और वैज्ञानिकों की मान्यता है कि उगते…

  • पंचांग म्हणजे काय? | pachang mahanje kay? | what is panchnag?

    पंचांग म्हणजे काय? | pachang mahanje kay? | panchangacha upay kay? भारतीय पंचांग का आधार विक्रम संवत है जिसका सम्बंध राजा विक्रमादित्य के शासन काल से है। ये कैलेंडर विक्रमादित्य के शासनकाल में जारी हुआ था। इसी कारण इसे विक्रम संवत के नाम से जाना जाता है। पंचाग पाँच अंगो के मिलने से बनता है,…

  • मंगळ दोष | Mangal Dosh Mahnje kay

    मंगळ दोष का्य आहे ? मंगळ आपल्या कुंडली मध्ये नकी आहे का ? Mangal Dosh Mahnje kay 1. अगस्त्य संहिते च्या प्रमाणे –धने व्यये च पाताले जामित्रे चाष्टमे कुजे।भार्या भर्तु विनाशाय भर्तुश्च स्त्री विनाशनम्।। 2. मानसागरी च्या प्रमाणे –धने व्यये च पाताले जामित्रे चाष्टमे कुजे।कन्या भर्तुविनाशाय भर्तु: कन्या विनश्यति।। 3. बृहत् ज्योतिषसार च्या प्रमाणे –लग्ने…

  • कंजुष कदर्याची कथा

    अध्याय २९ – कंजुष कदर्याची कथा वाल्मिकी मुनी निघून गेल्यावर दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांनी खूप विचार केला तेव्हा राजा म्हणाला, “मी आता है सगळे राजवैभव सोडून तपोवनात जातो. तेथे तपश्चर्या करून माझ्या जन्माचे सार्थक करतो.” राणी म्हणाली, “मग मी ह्या राजवाड्यात राहून सुनांच्या हाताखाली कुत्रीप्रमाणे जीवन कंठू, की काय? महाराज, जेथे पती तेथे…

  • संतान प्राप्ती साठी प्रभावी उपाय | santan prapti upay

    संतान प्राप्ती साठी प्रभावी उपाय | santan prapti upay संतान प्राप्तीसाठी कुंडली कशी पहावी आणि कोणते उपाय उपयुक्त ठरतील, हे पाहूया. संतान होत नसेल तर जन्म कुंडली काय दर्शवत आहे, याचा विचार करा. लग्नाला अनेक वर्षे झाली तरी संतान झालेली नाही. डॉक्टर कडे गेलेल्या तरी काही उपयोग होत नाही. जन्म कुंडली पाहिल्यावरही संतान नाही. “क्या…

  • खग्रास चंद्र | When Chandra Grahan 2025-Sep-07

    खग्रास चंद्रग्रहण केव्हा ग्रहण पाळावे ? Chandra Grahan 2025 भाद्रपद शु. १५, रविवार, ७ सप्टेंबर २०२५श्रीवर्ष स्पर्श – संमीलन – उन्मीलन – मोक्ष मुंबई येथील ग्रहणस्थिती स्पर्श संमीलन मध्य उन्मीलन मोक्ष पर्वकाल २२:५७ २३:०० २३:४२ २४:२५ २५:२७ ३:३० (वरील सर्व वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत.) चंद्र ग्रहण दिसणारे प्रदेश कोणते आहेत ? भारतात चंद्र ग्रहण दिसेल…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.